Loksatta Podcast: पुरातन वस्तू कायद्याचे महत्त्व काय? | Importance of Convention Heritage Cultureभारत सरकारने गेल्या काही वर्षांत २०० पेक्षा अधिक पुरावशेष भारतात परत आणले. पुरावशेष भारताबाहेर जाणे किंवा जाऊ दिले जाणे हीच खेदजनक बाब आहे. भारत जगातील चार प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. त्यामुळे आपल्या पुरावशेषांना जगभरात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मात्र भारतीयांमध्ये या पुरावशेषांशी संबंधित कायद्यांबाबत फारशी जगजागृती नाही. मुळात हे कायदे कशासाठी, त्यांचे महत्त्व नेमके काय…जाणून घेऊयात