Description
अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असले, तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये, झालेल्या नुकसानाची भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना दिली. अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अकोला जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. यावेळी त्यांनी म्हैसपूर, कापशी व चिखलगाव येथील शेतकºयांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली. यावेळी बाधीत शेतकºयांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. तुम्हीच आमचे मायबाप आहात....एवढे नुकसान झाल्यावर तुम्हीच सांगा आता आम्ही कसे जगायचे, असा टाहोच शेतकºयांनी फोडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांना धीर देत नुकसानाची पूर्ण भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!#LokmatNews #DevendraFadnavis #Maharashtra News #CMtestifiestofarmersमित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.comTo Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatAppLike Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmatFollow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019